कृष्ण आणि मी - भाग १

कृष्ण आणि मी - प्रस्तावना

"कृष्ण" हा शब्द वाचला किवा ऐकला तर डोळ्यापुढे काय ऊभ राहत? ऊभ राहत ते माहाभारत, कंसाचा वध, अर्जुनाला सांगितलेली भगवतगीता, द्रौपदीची झालेली घोर विटंबना, प्रेमाने ओतप्रेत भरलेली राधा, आणि बरच काही. श्रीकृष्णचा जिवनपट जर उकलून पाहीला तर एकच प्रश्न पडतो "खरच तो होता तरी कोण?". आणि त्याच्या जिवनपटातुन त्याच उत्तर कदाचित अस देता येईल.

देवकीनंदन.... एक पुत्र,
बालगोपाल.... एक सर्वप्रिय
कान्हा.... एक बंधु
गोविंद.... एक गवळी
केशव.... एक तारणहार
मुरली.... बासरीच्या संगतीने मन मोहुन टाकणारा
राधावल्लभ.... एक प्रियकर
कृष्ण.... एक शत्रु
मुकुंद.... एक शिष्य
माधव.... एक मार्गदर्शक
स्वामी.... एक पती
श्याम.... एक सखा
तात.... एक पिता
आणि श्रीकृष्ण.... माहाभारताच युद्ध आपल्या बोटावर नाचवणारा एक कुशल द्युतपटाकार.

अशी कोणती भुमिका जी त्याने बजावली नाही. त्याने आपल्या जिवनात सगळ्याच प्रकारच्या भुमिका पार पाडल्या. तो कधी कोणाचा मित्र बनुन आला, कधी कोणाचा बंधु बनुन, तर कधी कोणाचा गुरु.

मला असं वाटत तो आजही प्रत्येकाच्या मनात तसाच वावरतो, त्यांना आधार देतो, त्यांच्याशी रोज संवाद साधतो, त्यांना योग्य-अयोग्यातला फरक समजावुन सांगतो. आपल्याला गरज आहे फक्त त्याचा तो आवाज ऐकण्याची. खरच कोण आहे तो? हो! तो तोच आहे. तुम्ही योग्य तेच समजला, तुमच्या अंर्तमनातला आवाज म्हणजे तोच.
पण मला वाटत कदाचीत त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचय, काहीतरी पटवुन द्यायचय. जे तुमच्या नजरेतुन वारंवार निसटतय, अस ते त्याला तुमच्या ध्यानात आणुन द्यायचय. आणि त्यासाठीच त्याने जिवनभर धडपड केली, राजकारण रचल, गीता सांगितली.

"कृष्ण आणि मी" ही कसलीही कथा नाही, ही आहे सुरवात. सुरवात! त्याला जाणण्याची, त्याला ऐकण्याची आणि आपल्यातला कधीही न उलगडलेल्या कृष्णाला समजुन घेण्याची. वाचकांना फक्त माझी एकच विनंती आहे, ती ही की "कृष्ण आणि मी" मधला "मी" वाचकांनी स्वतः समजुन वाचावा. म्हणजे तुमच्यातला कृष्ण तुम्हाला अधिकाअधिक उलघडेल. चला तर मग, सुरवात करुया त्याच्या आगमनाने.


भाग १ - आगमन

रात्रीचे १० वाजले, नुकतच जेवण उरकल होत. गादीवर पडयाच्या विचारातच होतो, पण लगेच लक्षात आल की रूम खुपच अस्तावस्त होती. उद्या माझा वाढदिवस होता. मग विचार केला की वर्षाच्या शेवटच्या दिवशी तरी काही चांगलच कराव. मग काय, सगळा पसारा सावरुन वरती ठेवला. रूम झाडुन स्वच्छ केली. अर्धा बादली डेटॉलच पाणी घेऊन सगळी फर्शी स्वच्छ पुसली. सगळी पुस्तक नीट लावली, कपडे घडी करून ठेवले आणि बाकीचा पसारा योग्य ठिकाणी लावला. छान स्वच्छ स्वच्छ माझी रूम दिसत होती. नेहमीप्रमाणेच मोबाईल मधे एक रूमचा फोटो काढला आणि आईला whatsapp वर send केला.

मी, माझी ८*१० ची रूम, त्यात पहुडलेली माझी प्राणप्रिय पुस्तके, १ टीबीची harddisk जोडलेला एक laptop, पाच दिवसांचा आधार देणार ऑफिस आणि weekend ला आई-बाबा सोबत घरी. बस ईतकसच माझ आयुष्य. पण तिथे एकट असुनही कधीच मला एकटेपणाचा कंटाळा आला नाही.

उद्याच्या विचार करता करता गादीवर बुड टेकवल. सगळी काम निपटवतां निपटवता १२ वाजत आले होते. मग सगळ्यांचेच call येण सुरू झाले. आई, बाबा, बहीण, काही नातेवाईक आणि जवळचे सगळेच जिवलग मित्र. मग whatsapp चेक केल तेव्हा माझ्या college चा ग्रुप "ईलिजीबल बँचलर्स"च नाव बदलून "Happy Birthday ******" ठेवण्यात आल. सगळ्यांनाच "Thank you all" असा reply टाकुन net pack बंंद केला. जुन्या आठवणीच्या संगतीतच चादर अंगावर ओढली आणि तेच बाजुला पडलेल्या भगवतगीतेवर लक्ष गेल. माहाभारत वाचलेल्या सगळ्या आठवणी मनात गर्दी करू लागल्या. कंसाचा अमानुषपणा, पांडवांचा खडतर जिवन प्रवास, दानवीर कर्णाचा स्वतःच्या सन्मानासाठी चाललेला संघर्ष, दौपदीची घोर विटंबना, दुर्योधनाने ओलांडललेली मर्यादा, शक्तीशाली तरीही कमकुवत असलेले पितामह भिष्म आणि सगळ्याच बाबतीत आंधळे असलेले धृतराष्ट्र. पण या सगळ्यात वेगळा असा खोडकर, पराक्रमी, प्रिय, आदरणीय, पुज्यनीय, श्रेष्ठ आणि खरा मुसद्दी राजकारणी श्रीकृष्ण. किती भाग्यवान तो अर्जुन, ज्याला श्रीकृष्णासारखा सखा लाभला. क्षणभर मनात एक विचार तरळुन गेला "किती छान झाल असत जर अर्जुनाऐवजी कृष्ण मला भेटला असता!". 
डोळे लावता लावता मलाच ऐकु जाईल अश्या आवाजात म्हणालो "येशील का रे कृष्णा!!!"  कृष्णविचारातच केव्हा झोप लागली माझ मलाच कळल नाही.

सकाळचा ६ चा alarm वाजला. डोळे न उघताच आवाजाचा वेध घेत मोबाईलसाठी हात चाचपडु लागलो. डोक्यात विचारांची श्रुंखला सुरू झाली. मन माझ्याशी संवाद साधू लागल
"अरे ऊठ लवकर, आज ९ ऑक्टोबर! वाढदिवस आहे ना तुझा. वर्षाचा पहिला दिवस जर चांगला गेला तर पुर्ण वर्ष पण चांगल जात म्हणतात"

"खरय तुझ! चला ऊठून कामाला लागुया" मी म्हणालो.

"अरे पण मोबाईल का सापडत नाहीये?" मन म्हणाल

नाईलाजान डोळे ऊघडले. सगळ कस अंधूक अंधूक दिसत होत. बाजुला बघतो तर काय, सुवर्णाने मढवलेली मोजरी परिधान केलेला निमगोरा पाय दिसला. पायाच्या थोड्याच वरती काळा करदोळा सुद्धा बांंधला होता. अतिशय सुंदर किवा विशेष कौशल्य प्राप्त असणाऱ्या व्यक्तींना नजर लागु नये म्हणुन असा काळा करदोळा बांधतात अस मी ऐकल होत.

मनात विचारांची श्रुखंला पुन्हा सुरु झाली
"सकाळचे ६ वाजलेत, म्हणजे समोरचा दरवाजा तर आतुन बंद असावा. मग ही मोजरी घातलेली व्यक्ती आत आली तरी कशी?"

दचकुन पण नाईलाजाने मी उठलो. समोर बघतो तर काय, साक्षात कृष्ण माझ्यासमोर बसलेला होता. माझा मोबाईल हातात घेऊन माझ्याकडे बघत मंदपणे हसत होता. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.
मोबाईल मधला alarm अजुनही वाजतच होता. हसतच मोबाईल न्याहाळत मला तो  म्हणाला

"किती निराधार झाली आहे आजकालची लोक! सकाळी ऊठायला सुद्धा त्यांना मोबाईल नावाच यंत्र लागत आणि याला तुम्ही याला प्रगती म्हणता का रे? अरे आमच्या काळात तर आम्ही काक पक्षाच्या किलबिलाटानेच उठायचो. तेव्हा असली यंत्र नव्हती जी माणसाला आळशी बनवुन सोडेल. मुख्यता म्हणजे अश्या प्रकारच्या विज्ञानावर बंदीच होती अस समज".

क्षणभर मनात एक विचार तरळुन गेला "खरय याच म्हणन, आपण किती अवलंबून राहतो या यंत्रांवर".
तरीही मी काहीच न समजल्यासारखा बघत होतो. तो खरच कृष्ण होता हे मनाला कळत होत पण वळत मात्र नव्हत. तरीही मी प्रश्न केलाच
"कोण तु? ईथे आत कसा आलास?" मी दरवाज्याच्या कडीकडे बघत विचारल.
"अरे हा काय प्रश्न झाला! तुच तर मला बोलवलय ना!" कृष्ण म्हणाला.
"मी तुला बोलवलय?" मी पुन्हा प्रश्नांकीत मुद्रेत उत्तरलो.
"हो! तुच तर म्हणाला होता ना...."येशील का रे कृष्णा". तुझी हाक ऐकली आणि तसाच निघुन आलो बघ!" कृष्ण हसत म्हणाला. त्याच लाघवी हास्य मन मोहुन घेत होत.

"तु खरच कृष्ण आहेस?" मी त्याला उत्सुकतेने न्याहाळत विचारल.

"का! तुला त्यात काही संशय आहे का?" कृष्ण पुन्हा काहीसा मंद हसतच म्हणाला.

आमची एकच डोळाभेट झाली. डोळ्यातच काही अबोल संवाद झाले. मी हळुवारपणे हात पुढे करत त्या स्वर्णरुपी बासरीला हात लावला. तो खरच कृष्ण होता. मनात आनंदाचा पारा फुटला. कंठ गहिवरून आला आणि डोळ्यात अानंदाश्रु तरळले. जिवनाच सार्थक झाल्यासारख वाटल.
"अरे रडतोस काय वेड्यासारखा?" कृष्ण म्हणाला.

"sorry! तुला बघताच काय कराव ते सुचलच नाही, आणि माझ्यापेक्षा तु हे जास्त चांगल समजतोस" मी म्हणालो.
"पण तु आत आलास तरी कसा?" मी काहीसा उपहासाने हसत हसत विचारल

"आत आलो म्हणजे काय विचारतोस वेड्या! मी तुझ्या आतच तर होतो, फक्त तुझ्या हाकेने तुझ्या समोर आलो" तो पुन्हा हसत हसत म्हणाला"

कृष्णाला उपहासात बोलण मलाच माहागात पडल. पण त्याच उत्तर मनाला भेदुन गेल.
"माझ्या आत म्हणजे? मला कळल नाही कृष्णा?" मी प्रतिप्रश्न केला

"अरे वेड्या, मी अनिकेत (ज्याला घर नाही असा तो - ईश्वर), म्हणुन मी प्रत्येकाच्या हृदयात(म्हणजेच अंर्तमनात) राहतो, आणि जर कोणी हाक मारली तर लगेच समोर येतो".

"म्हणजे कृष्ण आपल्या हृदयातच होता तर. सांभाळुन ठेव बाबा याला, सोडुन गेला तर!" मन मला म्हणालं.

"वेड्या मी कोणालाही कधीच सोडुन जात नाही. मी सदैव त्याच्या सोबतच असतो. फक्त तुम्हीच माझ अस्तित्व नाकारता आणि मग भय आणि अहंकार यांना बळी पडता. आणि हो! मी आता कायमचा आलोय आणि माझ्यावाचुन तुझी काही सुटका नाही" कृष्ण हसत हसत म्हणाला.

"म्हणजे तु मनातल सगळ ऐकतोस?" मी दचकून विचारल

माझ्या चेहऱ्यावरच्या आश्चर्यकारक भावाकडे बघुन तो नुसताच हसला, आणि त्याच्या हसण्यात मी सुद्धा सामील झालो.


२४-मे-२०१६
कृष्णवेडा

Comments

  1. Chaan Ashish..pahile watal he fkt tuza sathich maryadit..pn nntr jamawlas Mitra..good

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भरत. मला वाटत कृष्ण कोणा एकासाठी नक्कीच मर्यादित नाही, मुळात त्याची कसली मर्यादाच नाही. तो अनंत आहे. "कृष्ण आणि मी" चे पुढचे पुष्कळ भाग सादर होणार आहे, आशा करतो ते तुला खुप आवडेल.

      Delete
  2. Sundar ahe... lihat raha. All the best!

    ReplyDelete
  3. Good one sir...! Keep it alive in you...!!

    ReplyDelete
  4. not only me....he is alive in all of us.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog